Type Here to Get Search Results !

सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यावर वाहतूक पोलीसांची खुलेआम लुटमार सुरु ; वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ?

सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यावर वाहतूक पोलीसांची खुलेआम लुटमार सुरु ; वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ?


अनकढाळ टोल नाक्यावरील वाहतूक पोलीस व्यवस्थेचा पंचनामा भाग :- २


माणदेश मैदान न्युज -

{मुख्य संपादक - बबन चव्हाण}

        रत्नागिरी - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथील टोल नाक्यावर वाहतुकीच्या नियमांचा धाक दाखवून कारवाईची भीती घालून नॅशनल हाइ -वे नं - १६६ राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांकडून महाराष्ट्र राज्यातील व परराज्यातील वाहनधारकांची अक्षरशा आर्थिक बाबत मोठी पिळवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार रविवारी सांगोला येथील मार्केट यार्ड मध्ये भरत असून बाजारामध्ये येणारे जनावरे कोल्हापूर, सांगली, मिरज,कवठेमंकाळ,खानापूर तासगाव,विटा,कडेगाव,कडेपूर,विटा,आष्टा शिराळा, हातकणंगले,इचलकरंजी इस्लामपूर वाळवा,पलूस,आटपाडी कर्नाटक राज्यातील,महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जिल्हयातील पशुधन खरेदी - विक्रीसाठी चारचाकी गाडीतून येत असून मोठे-मोठे व्यापारी व शेतकरी उद्योग व्यवसायासाठी सांगोला आठवडा बाजारात येत असत त्यांना ह्या सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यावरील वाहतूक पोलिसांकडून वाहनांच्या कागदपत्रे चेकिंग च्या नावाखाली आर्थिक लूटीचां मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

    

    दिवसभर टोलनाक्यावर ४ ते ५ वाहतूक पोलिस कर्मचारी व एक सहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी असून दिवसभर माल गोळा करायचा कार्यक्रम अविरथपणे  दिवसरात्र सुरू असतो.रत्नागिरी - सोलापूर महामार्ग पुढे पंढरपूर,नागपूर, हैदराबाद, अशा अनेक शहरासोबत जोडत असून या राष्ट्रीय महामार्गावरून लाखो वाहने ये - जा करत असून रात्रं-दिवस वाहनाची येथे वर्दळ असते.याचं सुवर्ण संधीचा फायदा घेऊन राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यावरून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यावर राज्यातील व परराज्यातील वाहने तपासण्याच्या कारणावरून अडवणूक करून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैशाची वसुली केली जाते.प्रवासांच्या गाडीची कागदपत्रे,लायसन,पीयूसी,पर्यावरण कर व इतर कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली पैशाची मागणी केली जाते.अपूर्ण कागदपत्रे कमतरता असल्यास १००० ते ५०० रुपये पर्यंत पठाणी वसुली केली जाते.ज्या वाहनधारकाची कागदपत्रे पूर्ण स्वरूपाची असतात अशा वाहनधारकाकडून सरासरी अंदाजे २०० ते ३०० रुपये घेतल्याशिवाय वाहन सोडत नाहीत असा धक्कादायक प्रकार ह्या अनकढाळ टोल नाक्यावर घडत आहे परंतु बाहेरील जिल्ह्यातील पशुधन खरेदी विक्रीसाठी आलेले शेतकरी व व्यापारी यांचे असलेल्या वाहनांना कोणतेही कागदपत्राची पडताळणी न करता चिरीमिरी घेवून जनावरे घेवून जाणारे वाहन हे सोडून दिले जाते , याचं करणास्तव शेतकरी वर्गास व व्यापारी बांधवांना आर्थिक स्वरूपाचा भुर्दुंड सोसावा लागतो.

    

      टोल नाक्यालाच आपल्या वसुलीचा अड्डा बनवलेला आहे.अनेक वेळा राज्य महामार्ग पोलीस अधिकाऱ्याकडून स्थानिक रहिवासी नागरिकांना उद्धटपणाची व दमदाटी केली जात आहे. राज्य महामार्गावर वाहतुकीच्या शिस्तीसाठी नेमलेले अधिकारी कर्मचारी आपल्या धुंदीत मस्त आहेत.रत्नागिरी सोलापूर राज्य महामार्ग नंबर १६६ म्हणजे आपल्याला वरिष्ठांनी दिलेली जहागिरीच आहे असे त्या ठिकाणी नियुक्ती केलेले अधिकारी कर्मचारी समजतात.राज्य महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची आपण कशीही व मनमानी पद्धतीने वसुली करू शकतो अशा अविर्भात येथील कर्मचारी व अधिकारी आहेत.यांच्या याच जाचाला कंटाळून संबंधित सर्व वाहनधारक हे वेडी वाकडी वाट करून म्हणजे शॉर्टकट मार्गे टोलनाका टाळून इतरत्र मार्गाने जात आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांकडून जी दिवसाढवळ्या टोलधाड सुरू आहे.यावर वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहनधारकांमधून व सांगोला तालुक्यातील सर्व जनतेमधून तीव्र नाराजीचा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments