महाराष्ट्र राज्यात कडक उन्हाच्या तापमानाने मोडला उच्चांक , उष्णतेची लाट येण्याची शक्यता...!
माणदेश मैदान न्युज:- कोळे / वाहिद आतार.महाराष्ट्र राज्यात उन्हाच्या कडक तापमानात प्रचंड वाढत चालले आहे.सूर्य देव अक्षरशः आग ओकत आहे.उन्हाचा तडाका वाढत चालल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली आहे.कडक पडलेल्या उकाड्यामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे.अशामध्ये हवामान खात्याने राज्यातील कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्र राज्यात सोलापूर मध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर मध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची आजपर्यंत नोंद झाली आहे.तर निफाड येथे राज्यातील सर्वात निच्चांकी म्हणजेच ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.सोलापूर बरोबरच रत्नागिरी, जेऊर, सांगली, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान सातत्याने ३७ अंशांच्या वर गेले आहे.
महाराष्ट्र राज्यातील कमाल तापमान सतत वाढत असल्यामुळे उष्णतेच्या झळा आणखी वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.सध्याचे हवामान हे सरासरीपेक्षा उष्ण आणि दमट राहणार आहे. हवामान खात्याकडून या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments