महाराष्ट्र राज्यात आजपासून 'एक राज्य, एक नोंदणी' योजनेला सुरवात, नागरिकांना कसा होणार फायदा?
माणदेश मैदान न्युज (कोळे प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित केलेल्या"एक राज्य, एक नोंदणी" योजनेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर आणि उपनगरात सुरू होत आहे. आजपासून (१७ फेब्रुवारी २०२५) पासून ही पद्धत लागू केली जाणार असून, यशस्वी झाल्यास पुढील एका महिन्यात संपूर्ण राज्यात ती लागू करण्याचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे.सध्याची नोंदणी प्रक्रिया आणि तिच्या मर्यादा सध्या महाराष्ट्रातील जमिनी आणि मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी संबंधित जिल्ह्याच्या सहनिबंधक कार्यालयातच करावी लागते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने इतर जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी केली, तर तिला त्या जिल्ह्यात जाऊनच दस्त नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गैरसोयीची ठरत असल्याने, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक राज्य, एक नोंदणी ही संकल्पना जाहीर केली. या धोरणामुळे राज्यभर कुठेही दस्त नोंदणी करता येणार असून, खरेदीदारांना इच्छित ठिकाणी व्यवहार पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
एक राज्य एक नोंदणी राज्यभर विस्ताराची योजना लवकरचं...
या उपक्रमातील तांत्रिक अडचणींचे निराकरण केल्यानंतर पुढील एका महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही योजना लागू करण्याचे नियोजन आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी सांगितले की, टप्प्याटप्प्याने हा उपक्रम इतर जिल्ह्यांतही राबवण्यात येईल.पुढील म्हणजे येत्या मार्च महिन्यात दस्तनोंदणी मोठ्या प्रमाणावर केली जाते, कारण रेडीरेकनर दरांत वाढ होण्याची शक्यता असते त्यामले आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यभर हा उपक्र करण्याऐवजी, मुंबईतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments